बंद

    उमेद

    विभाग प्रमुखाचे नाव श्री.प्रफुल च.भोपये
    पदनाम जिल्हा अभियान व्यवस्थापक
    दुरध्वनी क्रमांक ७९७२२१४९७५
    ई-मेल dmmugadchiroli@gmail.com
    कक्ष प्रमुखाचे नाव श्री.सतीश ना. सायंकार
    पदनाम कार्यालय अधिक्षक 
    दुरध्वनी क्रमांक ९८९०३६०००६
    ई-मेल dmmugadchiroli@gmail.com 

                राज्यातील ग्रामीण भागातील गरीबीचे निर्मुलन करण्यासाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय ग्रामीण जीवन्नोंनती अभियानाची सुरुवात सन २०११ मध्ये केली. महाराष्ट्र राज्यात सदरील अभियानाची अंमलबजावणी करण्यासाठी मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामविकास विभांगांतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोंनती अभियान या स्वतंत्र संस्थेची स्थापना संस्था नोंदणी अधिनियम १८६० अन्वये करण्यात आलेली आहे. सदरील अभियानाची अंमलबजावणी राज्यातील ३४ जिल्हे  व ३५१ तालुक्यातील पुर्ण ताकदीने अभियान राबविले जात आहे.

                  महाराष्ट्र राज्यातील ७१ लक्ष गरीब कुटुंबांना शाश्वत उपजीविकेच्या माध्यमातून गरिबीतून बाहेर काढण्यासाठी अभियान कटीबद्ध आहे. या करीता समुदाय संघटन, गरिबांच्या गरीबांनी निर्माण केलेल्या बळकट समुदायस्तरीय संस्थांची निर्मिती, विविध पथदर्शी प्रकल्प, स्वयंसेवी व शासकीय तसेच खाजगी संस्थासोबत भागीदारी अद्यावत मनुष्यबळ संसाधन विकास पद्धती, शाश्वात उपजीविकेचे स्तोत्र उभे करण्याकरिता अभियानामार्फत तसेच विविध वित्तय संस्था व बँकांच्या माध्यमातून वेळेवर, किफायत व्याज दराने व नियमित वित्त पुरवठा, कृतीसंगमांच्या माध्यमातून विविध शासकिय योजनांचा गरीब कुटुंबांना लाभ मिळविण्याकरिता समुदायस्तरीय संस्थांची क्षमता बांधणी करणे, अशा अनेक नाविन्यपूर्ण व परिणामकारण पद्धतीने अभियानाची अंमलबजावणी राज्यात करण्यात येत आहे.

                    अभियानांतर्गत गरीबी निर्मूलनाचा समग्र विचार केलेला असून यामध्ये समुदाय विकासापासून ते शाश्वात उपजीविका निर्माण करण्याच्या सर्व बाबींचा समावेश आहे. सामाजिक समावेशन, आर्थिक समावेशन, वित्तीय समावेशन व सार्वजनिक सेवांची उपलब्धी व विकास योजनांचा लाभ हे अभियानाचे आधारस्तंभ आहेत. ग्रामीण महाराष्ट्रातील गरीब व जोखीमप्रवण कुटुंबांना समृद्ध, आत्मसन्मानाने व सुरक्षित जीवन जगता यावे, यासाठी त्यांच्या सर्वसमावेशक, लोकशाही तत्त्वावर आधारित स्वयंचलित समुदाय संस्थांची निर्मिती करून त्यांचे अधिकार व हक्क, विविध वित्तीय सेवा, तसेच शाश्वात उपजीविकेच्या संधी प्राप्त होण्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करण्याचे काम महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोंनती अभियानामार्फत करण्यात येत आहे.

                         अभियानाच्या १२ वर्षाच्या अंमलबजावणी दरम्यान राज्यभर या अभियानाची फलनिष्पत्ती दिसून येत आहे. ग्राम संघ आणि प्रभाग संघांच्या स्थापना होऊन संस्थीय बळकटीकरण होताना दिसत आहे. महिला सदस्यांच्या सर्व प्रकारच्या क्षमतांचा विकास होताना दिसत आहे. महिलांच्या कौशल्यामध्ये वृद्धी होताना दिसत आहे. स्वयंसहाय्यता गटांच्या महिलांचे शेती आधारित, बिगर शेती आधारित उद्योग व्यवसाय उभे राहत आहेत. उत्पादक गटांच्या स्थापना होत आहेत, शेतकरी महिला कंपनी स्थापन होत आहेत. दारिद्र्य निर्मूलनाचे उद्दिष्ट निश्चित साध्य करण्यासाठी सर्व स्तरावर कालबद्ध नियोजन करण्यात आलेले आहे.

    व्हिजन : शाश्वत उपजीविकेचा “समान, समृद्ध, लैंगिक-न्यायपूर्ण आणि चैतन्यमय महाराष्ट्र जिथे सर्व लोक सन्मानाने आणि सुरक्षिततेने जगतात”, समृद्धी, सन्मान आणि सुरक्षिततेचे जीवन. 

    मिशन : एक समर्पित आणि संवेदनशील संस्था जी ग्रामीण महाराष्ट्रातील गरीब आणि असुरक्षित कुटुंबांसाठी सर्वसमावेशक, लोकशाही आणि स्वयं-व्यवस्थापित समुदाय संस्था, हक्क आणि आर्थिक सेवांमध्ये प्रवेश आणि शाश्वत उपजीविकेच्या पोर्टफोलिओद्वारे समृद्ध, सन्मान आणि सुरक्षिततेचे जीवन जगण्यासाठी सक्षम वातावरण निर्माण करते.

    • गरीब व जोखीमप्रवण कुंटूंबाचा अभियानात समावेश करणे.
    • सर्वसमावेशक व लोकशाही तत्वावर गरीबांच्या संस्थाची उभारणी करुन त्यांची क्षमता बांधणी करणे.
    • वित्तीय सेवा व शासकीय लाभ मिळवून देणे.
    • सामाजिक सुरक्षा निर्माण करणे.
    • शाश्वत उपजीविका निर्माण करणे.
    • कृतीसंगमाच्या माध्यमातून विविध शासनाच्या योजनांचा लाभ देणे.
    • गरीबांच्या आयुष्यात समृध्दी निर्माण करणे

    राज्यस्तरीय : 

    • मा. अपर मुख्य सचिव, ग्रामविकास व पंचायतराज तथा महासंचालक
    • मुख्य कार्यकारी अधिकारी तथा राज्य अभियान संचालक
    • राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष

      जिल्हास्तरीय :

    • मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा अभियान संचालक
    • प्रकल्प संचालक (जि. ग्रा. यं.) तथा जिल्हा अभियान सह – संचालक
    • जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष

      तालुकास्तरीय :

    • तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष

      गावस्तरीय :

    समुदाय संसाधन व्यक्ती

    सेवा :- समुदाय संस्थाना तांत्रिक सहाय्य आणि आर्थिक सहाय्य.

    फॉर्म :-

    • सर्व प्रकारच्या योजना संबंधित माहिती तसेच योजनेअंतर्गत वेळोवेळी उपलब्ध करून देण्यात येणारे सर्व शासन निर्णय खालील वेबसाइट वर मिळेल.
    • http://www.nrlm.gov.in
    • http://http//www.umed.in

     

    राज्य सरकार 

    • दारिद्र्य निर्मूलनाचे कार्यक्रम
    • समुदायस्तरीय संस्थांची निर्मिती
    • समुदायस्तरीय संस्थाना आर्थिक सहाय्य (SHG, VO, CLF, PG, FPO)

    केंद्र सरकार :-

    • आर्थिक  सहाय्य केंद्राचा वाटा ६० टक्के आणि राज्याचा वाटा ४० टक्के

    संयुक्त उपक्रम केंद्र आणि राज्य 

    • कृतीसंगमांच्या माध्यमातून विविध शासकिय योजनांचा गरीब कुटुंबांना लाभ मिळविणे  (जसे आदिवाशी विभाग, पशुसंवर्धन विभाग, कृषी विभाग, जिल्हा नियोजन केंद्र इ.)

    धोरणे आणि मार्गदर्शक तत्त्वे :-

    • सर्व प्रकारचे जिल्हयाशी संबधीत माहीती खालील वेबसाईट वर उपलब्ध आहे.
    • https://www.aajeevika.in/
    • http://www.umed.in
    • FY 2024-25 NRLM (2889.40 lakh)
    •  FY 2024-25 NRETP (237.58 lakh)

    वेळोवेळी अद्यावत केले जातील.

    • राज्य अभियान व्यवस्थापन कक्ष
    • जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष
    • प्रशिक्षण पुस्तिका :- Lokos, SM1, SM2, Financial management, PG basic training
    • हँडबुक :- Employee Handbook Etc.
    • ब्रोशर/ पॅम्फ्लेट :- Financial literacy, Lakhpati Didi Etc.
    • श्रीमती नैना कुमारे कनिष्ठ प्रशासकीय अधिकारी संपर्क क्रं. 9307054206
    • श्री राजेंद्र म. भुयार प्रकल्प संचालक (जि. ग्रा. यं.), गडचिरोली संपर्क क्र. 8624033595 प्रथम अपीलीय अधिकारी तथा प्रकल्प संचालक (जि. ग्रा. यं.), गडचिरोली